By Dr.Ravindra Patil
जन्मापासून संपूर्ण आयुष्यभर घेतलेला सकस आहार कुपोषणाच्या सर्व प्रकारांना तसेच मोठ्या प्रमाणात असंसर्गजन्य रोग टाळण्यास मदत करतो. परंतु झपाट्याने होणार्या शहरीकरणामुळे प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचा वाढता वापर आणि बदलती जीवनशैली यामुळे आपल्या आहाराच्या पद्धतीं,मध्ये खूप बदल झाला आहे.
लोकं ऊर्जा (एनर्जी व कॅलरीज युक्त), चरबी, शर्करा, मीठ वगैरे जास्त प्रमाणात असलेले पदार्थ जरूरी पेक्षा जास्त पदार्थ खातात. तसेच बरेच लोक पुरेशी फळे, भाज्या आणि आहारातील फायबरयुक्त (रेशा) गोष्टी, जसे की संपूर्ण धान्य वगैरे खात नाहीत. हे सर्व कारणे असमतोल खुराकास कारणीभूत ठरतात.
संतुलित आहार असा असतो की ज्यामध्ये योग्य प्रमाणात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ असतात की ज्यामुळे शरीरात चैतन्य आणि आरोग्य राखण्यासाठी सर्व पोषक तत्वांची गरज पुरेशा प्रमाणात पूर्ण केली जाते. त्याच बरोबर थोड्या अतिरिक्त पोषक तत्वांची अल्प तरतूद केली जाते, की जी कधीकाळी पोषक तत्वे कमी पडल्यास त्यांची उणिव भरून काढतात.
हल्लीच्या काळात अन्न समस्यां मध्ये चिंतेचे प्रमुख म्हणजे अन्न/पोषक घटकांचे अपुरे/असंतुलित सेवन. भारतातील सर्वात सामान्य पौष्टिक समस्यांपैकी एक म्हणजे जन्माच्या वेळचे वजन कमी असलेली बाळे, लहान मुलांमध्ये प्रोटीन-एनर्जी कुपोषण, प्रौढांमध्ये उर्जेची कमतरता, सूक्ष्म पोषक तत्वांचे कुपोषण आणि अयोग्य आहारांमुळे होणारे असंसर्गजन्य रोग. देशातील मानव संसाधन विकासासाठी आरोग्य आणि पोषण हे सर्वात महत्वाचे घटक आहेत.
जी मुले संतुलित आहार घेतात त्या मुलांचा निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीचा भक्कम पाया बनतो. यामुळे त्यांना दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा धोका कमी होतो. बालपणाचा काळ शारीरिक वाढीसाठी, मनाच्या विकासासाठी आणि संक्रमणांशी लढण्यासाठी सर्वात महत्वाचा काळ असतो. त्यामुळे मुलांना ऊर्जा, प्रथिने (प्रोटीन), जीवनसत्त्वे आणि खनिजे हे योग्य प्रमाणात मिळणे अत्यंत आवश्यक आहे. मुलांसाठी पूरक अन्न तयार करताना आणि त्यांना भरवतांना स्वच्छतेचे नियम पाळायला पाहिजेत. हात धुवून मगच मुलांचे जेवण बनवावे अथवा त्यांना भरवावे. अन्यथा मुलांना जुलाबाचे विकार होऊ शकतात.
पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे अनेक रोग आणि विकृती निर्माण होतात. पौष्टिकतेची कमतरता जगभरात प्रचलित आहे. पौष्टिकतेच्या कमतरते मुळे दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात जसे की मुडदूस (रिकेट्स), लोहाची (आयर्न) कमतरता व त्यामुळे एनिमिया, अशक्तपणा, थायरॉइटची गाठ (गॉयटर), लठ्ठपणा, कोरोनरी हृदयरोग, टाइप 2 मधुमेह, स्ट्रोक, कर्करोग आणि ऑस्टिओपोरोसिस.
मुलांमध्ये सामान्य पौष्टिक कमतरतेमुणे होणारे रोग
विविध प्रकारच्या शारीरिक कार्यांसाठी मुलांना लोहाची गरज असते. हा हिमोग्लोबिनचा एक भाग आहे, जे एक प्रथिन (प्रोटीन) आहे व फुफ्फुसातून उर्वरित शरीरात ऑक्सिजन वाहून नेते व तेथे स्नायूंना ऑक्सिजन साठवण्यात आणि वापरण्यात मदत करते. पुरेशा लोहाशिवाय मुले अशक्त होऊ शकतात आणि त्यामुळे इतर दुर्बल परिस्थितीं उत्पन्न होतात. त्यामध्ये सुस्ती आणि अयोग्य संज्ञानात्मक कार्य होऊ शकते. जेवणात मांस, कोंबडी, सीफूड, बीन्स, मटार, मसूर, गडद हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, लोहयुक्त तृणधान्ये, ब्रेड आणि पास्ता वगैरेमधून लोह मिळू शकते.
गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये (म्हणजे पोटापासून आतड्यांपर्यंत) लोह, मॅग्नेशियम, फॉस्फेट आणि झिंकसह कॅल्शियम शोषण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. हाडांच्या चांगल्या वाढीसाठी या जीवनसत्त्वाचे पुरेसे सेवन करणे आवश्यक आहे. ज्या मुलांमध्ये सूर्यप्रकाश मर्यादित असतो अशा मुलांमध्ये व्हिटॅमिन-डी ची कमतरता जास्त प्रमाणात आढळते. मासे आणि व्हिटॅमिन-डी घातलेले पदार्थ जसे की काही डेअरी उत्पादने, सोया दूध आणि तृणधान्ये खाऊन मुले व्हिटॅमिन-डी मिळवू शकतात. मासातील काळीज (यकृत) आणि अंड्यातील पिवळा बलक देखील व्हिटॅमिन-डी मध्ये समृद्ध असल्याचे ओळखले जाते.
जस्त हे बालपणातील वाढ, पचन, लैंगिक संप्रेरकांचा (हॉर्मोन्सचा) विकास आणि मजबूत प्रतिकारशक्ती यासाठी आवश्यक असलेले खनिज आहे. कमतरतेमुळे केस, त्वचा, नखे, संज्ञानात्मक कार्य आणि तुमच्या मुलांची उंची या सर्व गोष्टींवर नकारात्मक परिणाम करू शकते. सीफूड, मांस, शिजवलेले बीन्स, मटार आणि मसूर यांच्या व्यतिरिक्त तीळ, भोपळ्याच्या बिया, स्क्वॅश बियाणे, काजू आणि शेंगदाणे यांच्यातून झिंक सहजपणे आपल्या मुलांच्या आहारात समाविष्ट केले जाऊ शकते.
कमतरतेमुळे दात आणि हाडे खराब होतात, स्नायू बिघडतात, हृदयाच्या समस्या येतात, रक्त गोठण्यास अनियमितता येते, एन्झाईम्सचे कार्य बिघडते वगैरे होते. वाढत्या वयातील मुलांना कॅल्शियम जास्त प्रमाणात आवश्यक असते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, गडद हिरव्या पालेभाज्या, सोया, टोफू, मासे, बदाम, बिया आणि मजबूत तृणधान्ये हे कॅल्शियमचे स्त्रोत आहेत.
व्हिटॅमिन-ए ची कमतरता (यालाच VAD असे म्हणतात) गरीब समाजांमध्ये जास्त वेळा आढळते. रातांधळेपणा हे व्ही.ए.डी.च्या पहिल्या लक्षणांपैकी एक आहे, कारण फोटोट्रान्सडक्शनमध्ये व्हिटॅमिन-ए ची मोठी भूमिका असते. जर कमतरता अधिक तीव्र असेल तर पूर्ण अंधत्व येऊ शकते. पालक, गाजर, रताळी आणि लाल मिरची यांसारख्या पिवळ्या, लाल आणि हिरव्या (पालेदार) भाज्यांमध्ये हे व्हिटॅमिन असते. म्हणून या भाज्या जरूर कराव्यात.
फोलेटच्या कमतरतेमुळे मोठ्या आकाराच्या लाल रक्तपेशी (मेगालोब्लास्ट) बनतात व एनिमिया होतो. यामुळे अशक्तपणा येतो. अशा रक्तपेशी शरीरात फॉलिक ऍसिडचे अपुरे साठे असताना तयार होतात. फोलेटची कमतरता टाळण्यासाठी तुमच्या मुलाला गडद हिरव्या पालेभाज्या (सलगम, पालक, लेट्यूस, शतावरी, ब्रसेल्स स्प्राउट्स, ब्रोकोली), बीन्स, सीफूड आणि शेंगदाणे वगैरे जरूर खायला द्या.
मज्जासंस्थेच्या सामान्य कार्यामध्ये आणि अस्थिमज्जामध्ये लाल रक्तपेशींच्या परिपक्वतामध्ये रक्ताभिसरण प्रणालीमध्ये व्हिटॅमिन बी12 महत्वाचे आहे. मासाहारी जेवण किंवा बी12 असलेला पूरक आहार हे बी12 चे स्त्रोत आहेत. व्हिटॅमिन बी12 असलेल्या पदार्थांमध्ये मांस, क्लॅम, काळीज (यकृत), मासे, पोल्ट्री, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश होतो. लहान बाळांची अनेक पौष्टीक पावडरीत बी12 घातलेले असते.
समर्थ न्यूरो आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 100+ बेड आहेत आणि हे न्यूरोलॉजिकल समस्या / आजारावरील इमर्जन्सी सर्जरीमध्ये आणि निदानामध्ये तज्ञ आहे.