अल्झायमर रोग -2

अल्झायमरचे औषध @ समर्थ / Alzheimer's medication @ Samarth

अल्झायमर रोग म्हणजे काय?

अल्झायमर रोग हा एक मेंदूचा विकार आहे जो हळूहळू स्मरणशक्ती आणि विचार कौशल्ये आणि अखेरीस, सर्वात सोपी कार्ये पार पाडण्याची क्षमता नष्ट करतो.

हा रोग अनेक लोकांना होतो. भारतात दरवर्षी 10 लाखांहून अधिक केसेस होतात. सांगली-मिरज आणि कोल्हापूर सारख्या भारतातील मध्यम आकाराच्या शहरांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा भारतात अल्झायमर रोगाने ग्रस्त लोकांची संख्या जास्त आहे !

आपल्यामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना अल्झायमरचा त्रास आहे, अशा लोकांना कशाप्रकारे मदत करावी व त्यांच्याशी कसे वागावे हे समजून घेणे आवश्यक आहे. आपण केवळ मदत केली पाहिजे असे नाही तर त्यांच्यावर लक्ष ही ठेवले पाहिजे.

खाली दिलेली एक वास्तविक जीवन कथा काही अंतर्दृष्टी देऊ शकते.

खर्या आयुष्यातील एका अल्झायमर रुग्णाची कथा

अल्झायमर रोगाच्या रुग्णाच्या कथेबद्दल वाचून या रोगाबद्दल अधिक स्पष्टता येईल कारण वर नमूद केल्याप्रमाणे, हा वेदना, दुखापत, संसर्ग किंवा कर्करोगाचा आजार नाही. हा मेंदूचा हळूहळू नुकसान होत असलेला आजार असून त्याचा परिणाम रुग्ण आणि त्याचे अथवा तिचे कुटुंब, मित्र, शेजारी आणि समाज यांच्यावर ही होतो.

सुरेश [नाव बदलले आहे], 71 वर्षीय पुरुष. त्याला औषधांनी बरे न वाटणार्या नैराश्याच्या (डिप्रेशनच्या) लक्षणांमुळे त्याच्या फॅमिली डॉक्टरांनी मानसोपचार तज्ज्ञाकडे पाठवले होते. सुरेशच्या पत्नीने सांगितले की निवृत्तीनंतर सुमारे एक वर्षानंतर वयाच्या 68 व्या वर्षी तो बदलू लागला होता. ज्याचा त्याने आयुष्यभर आनंद घेतला होता आशा दोन गोष्टी म्हणजे पत्ते खेळणे आणि मित्रांसोबत बाहेर जाणे त्याने बंद केले होते. तो घराबाहेर जाण्यास अजिबा तयार नसायचा. त्याने बाहेर जाऊन इतरांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला. तो दिवसभर सोफ्यावर बसून टीव्ही पाहत असे किंवा डुलकी घेत असे. त्याच्या पत्नीने सांगितले की तो त्याच्या सामान्य सात तासांऐवजी तो दर रोज 10-13 तास झोपतो.

त्यांच्या पत्नीला काळजी वाटली की सेवानिवृत्तीमुळे सुरेशला नैराश्य आले होते आणि तिने आपल्या चिंता त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना सांगितल्या होत्या. त्यांच्या डॉक्टरांनी सहमती दर्शवली आणि एंटिडप्रेसेंट लिहून दिले. सुरेशची लक्षणे औषधोपचाराने सुधारली नाहीत आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मानसिक तपासणीसाठी पाठवले.

सुरेशच्या धाकट्या भावांना मोठे नैराश्य होते ज्यावर मनोचिकित्सा आणि अँटीडिप्रेसंट औषधांनी उपचार केले गेले होते. त्याच्या आईला वयाच्या ७० च्या दशकात स्मृतिभ्रंश झाला होता. ही कौटुंबीक कारणे सुरेशचे निदान करण्यात महत्त्वाची होती.

सुरेशने कॉलेजमधून इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती. कॉर्पोरेट मॅनेजर म्हणून त्यांनी यशस्वी व्यावसायिक जीवन व्यतीत केले आणि तो वयाच्या 67 व्या वर्षी सेवानिवृत्त झाला. त्यांच्या लग्नाला 45 वर्षे झाली होती. त्यांना वैवाहिक जीवनात कोणतीही मोठी समस्या नव्हती. या जोडप्याला दोन मुले आणि पाच नातवंडे होती. या सर्वांची प्रकृती उत्तम होती. त्यामुळे सुरेशचे मानसिक संतुलन हरवून मानसिक रीते आजारी पडण्याचे कोणतेही कारण नव्हते. 70 वर्षांता होईपर्यंत तो आउटगोइंग, उत्साही आणि व्यवस्थित होते. मात्र 77 वर्षांनंतर त्यांनी नेहमीच उपभोगलेले चांगले आयुष्य त्याने गमावले होते.

सुरेशला अनेक वर्षांपासून उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉलचा त्रास होता आणि या परिस्थितीसाठी ते औषधे घेत होते आणि त्यांनी त्याला त्या बाबतीत बरे वाटले होते.

मानसोपचार तज्ज्ञांनी त्यांची तपासणी केली. यावरून असे दिसून आले की तो सावध आणि सहकार्य करणारा होता आणि त्याचे बोलणे स्थिर पण हळू होते. पण सुरेशकडे भावनिक अभिव्यक्तीची मर्यादा होती. त्याने दुःखी किंवा अपराधीपणाची भावना नाकारली. त्याला वाटले की तो खूप लवकर निवृत्त झाला आहे व त्यामुळे तो आजारी असतो. त्याच्या बायकोला त्याची काळजी वाटत होती याची त्याला जाणीव होती. सुरेशने स्वीकारले की त्याच्यात उत्साह व शक्ति कमी आहे आणि म्हणूनच तो अलीकडच्या काळात कमी सक्रिय होता. निवृत्तीनंतर झालेलल्या नकारात्मक बदलांना त्याने दोष दिला.

मानसोपचार तज्ज्ञांच्या तपासणीदरम्यान, सुरेश ते वर्ष कोणते होते ते सांगू शकला, परंतु त्या दिवशी कोणता महिना होता किंवा कोणता दिवस होता हे त्या माहित नव्हते. त्याला अनेक वस्तू दाखविण्यात आल्या, त्याने दोन मिनिटांनंतर तीनपैकी फक्त एका वस्तूचे नाव दिले. त्याने पाच पैकी तीन वजावाक्या बरोबर केल्या. तो त्याच्या सभोवतालच्या चार सामान्य वस्तूंना अचूक नावे देऊ शकला. त्याने चूक न करता एक लांबलचक वाक्य पुन्हा म्हणून दाखवले. कागद आणि पेन्सिलने त्याला घड्याळाचे चित्र काढता आले. त्याने घड्याळाचे आकडे देखील बरोबर काढले. पण दोन वाजून 10 मिनिटे वेळ दाखवण्यासाठी त्याला घड्याळाचे काटे कुठे असतील हे चित्रात दाखवता आले नाही.

या चाचण्यांसह इतर अनेक चाचण्यांमुळे मानसोपचार तज्ज्ञांना सुरेशला अल्झायमर रोगाचे निदान करण्यात मदत झाली. सध्या काही औषधांशिवाय कोणताही उपचार नसल्यामुळे सुरेशच्या पत्नी आणि मुलांना त्याच्या बिघडलेल्या मानसिक स्थितीशी जुळवून घ्यावे लागता आहे.

जसजसा वेळ निघून गेला, सुरेश हळूहळू त्याच्या आजूबाजूच्या वातावरणापासून दूर होत गेला. त्याच्या ढासळत्या प्रकृतीची त्याला पर्वा नव्हती. हेअर कटिंग सलूनमध्ये जाऊन तो घरचा पत्ता विसरला. त्याला एक ओळखपत्र देण्यात आले ज्यामध्ये त्याचे नाव व पत्ता दर्शविला होता आणि त्यामुळे लोकांना त्याला परत आणण्यास मदत झाली. एकदा तो ‘नो एंट्री’ झोनमध्ये फिरताना आढळल्याने त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

सुरेशला कुटुंबियांच्या उपस्थितीत पन्नास साठ वर्षांपूर्वीचे खूप जुने अनेक प्रसंग आठवायचे. कोणीही नागपूर शहराचा उल्लेख केला की तो म्हणायचे, माझी लेक (मुलगी) तिथे राहते. दुःखाची गोष्ट म्हणजे नागपूरचा उल्लेख करणारी व्यक्ती त्यांचीच मुलगीच होती.

अल्झायमर रोगाच्या रुग्णांना त्यांच्या जोडीदाराने किंवा कुटुंबाने पाठिंबा दिल्यास रोगी आरामदायी आयुष्य जगू शकतात. कौटुंबिक किंवा एखद्या वृध्धाश्रमात राहण्या शिवाय अशा रोग्यांना गत्यंतर नसते. सतत सपोर्ट मिळणे हेच अल्झायमर रोगाच्या रुग्णांना मदत करू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *